मुंबईत कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढ होत आहे. परिणामी कोरोनाला रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यात सर्ववसामान्यांसाठी लोकल सुरु झाल्यापासून रुग्णणसंख्येत वाढ होतांना समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यास वेळीच आवर घालण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने नव्याने आढावा सुरू केला आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. त्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.
आतापर्यंत 30 कोटींचा दंड वसूल
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर सुरुवातीपासूनच कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 15 लाख मुंबईकरांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्ययाकडून 30 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Comments
Loading…